Friday, September 11, 2015

Opposition Party : Basic Pillar of Democracy


Most Indians speak with great pride as though their country was already a democracy. The foreigners also, when they sit at a dinner table to do diplomatic honor to India, speak of the Great Indian Prime Minister and the Great Indian Democracy.
From this, it is held without waiting to argue that where there is a Republic, there must be democracy. It is also supposed that where there is Parliament which is elected by the people on adult suffrage and the laws are made by the People’s Representatives in Parliament elected after few years, there is democracy. In other words, democracy is understood to be a political instrument and where this political instrument exists, there is democracy. Is there democracy in India or is there no democracy in India? What is the truth? No positive answer can be given unless the confusion caused by equating democracy with Republic and by equating democracy with Parliamentary Government is removed.

According to Dr.B.R.Ambedkar Democracy is quite different from a Republic as well as from Parliamentary Government. He says “The roots of democracy lie not in the form of Government, Parliamentary or otherwise. A democracy is more than a form of Government. It is primarily a mode of associated living. The roots of Democracy are to be searched in the social relationship, in the terms of associated life between the people who form a society.”
From the above definition we can understand that democracy is to be found in social relationship in terms of associated life. India is known for its divers nature. We have thousands of castes, religions, different races and millions of languages. Despite having so many differences and diversified culture, we are considered to be united nation. And more over a strongest developing democracy of the world. 
Here, to make any democratic constitution a successful one, the countrymen must live a harmonious life and loyalty to public ends and mutuality of sympathy and co-operation. The question raises in mind that do we really have the above mentioned qualities in among us ? do the countrymen live a harmonious life without any social, political, economic and religious differences ? from the ages India consists of an innumerable collection of castes which are exclusive in their life and have no common experience to share and have no bond of sympathy. Given this fact it is not necessary to argue the point since we come across the caste hatred and atrocities in our day to life. The existence of the Caste System is a standing denial of the existence of those ideals of society and therefore of democracy.
Several eminent personalities have defined democracy. The dictionary meaning of the democracy is “government by the people in which the supreme power is vested in the people and exercised directly by them or by their elected agents under a free electoral system”.
Walter Bagehot defined democracy as “Government by discussion”. According to  Mr.Abraham Lincoln, democracy is a government “ of the people, by the people and for the people”.
Democracy is indeed the form of government elected by the people for them. But we have to understand that democracy is a set of ideas and principles about freedom. Dr.B.R.Ambedkar defines democracy in a unique way as thus “Democracy is a form and method of government whereby revolutionary changes in the social life are brought about without bloodshed.”
Among the above said few definitions Dr.Ambedkar’s definitions stands apt. the real test of democracy is to be analyzing the change in social life. Democracy is not just a form of government; it is mode of associated living, an essential attitude of respect and reverence towards our fellow men. But we can see that, in our day to day life, due to the different castes, religions, traditions and various faith each caste tends to dislike others just because they belong to different caste. But the greatest contribution of Indian Constitution is despite the differences, India is still going strong without any internal disbursement unlike our neighboring countries!
Let’s turn towards the main topic i.e. Opposition Party: The Basic Pillar of Democracy! in any democracy the opposition party plays a vital role.  In politics, the opposition comprises one or more political parties that are against the ruling government. Ideally the opposition party goes against the ruling party in any government.
The main role of the opposition party is to check and question the policies made by the ruling party and draw attention on the real causes of the nation and to stop ruling party from over powering people. It has to question the government of the day and hold them accountable to the public. The opposition is equally responsible in upholding the best interests of the people of the country. They have to ensure that the government does not take any steps which might have negative implications on the people of the country.
Basically, the opposition party have to check the excesses of the ruling or dominant party and not to be antagonistic. There are actions of the ruling party which may be beneficial to the masses and oppositions are expected to support thing. They should raise immediate protest and voice against the deemed injustice and wrong motions run by the ruling class in the parliament. The leader of opposition should always bear in mind that they are representing the people of India and fighting for justified demands and defending all the unlawful and unfair practices by the ruling classes.
The opposition party has to highlight the failures of the ruling government so convincingly that the common public gets to know the facts behind the failure and understand that the failures were because of the apathy of the government. In the event of a weak opposition party, the ruling government and its representatives may become complacent and insensitive for duration of their rule. Just have a glance through our history of past 15 parliaments and current one India has seen, we will understand that the strong opposition party is needed to safeguard the rights of the common people and for a strong democracy.
But, unfortunately in India, the ruling class and opposition party have become two sides of the same coin. One loot the country after another and without any morale ! In India, the opposition party is not performing its duty and stands as the People’s Voice. Both ruling and opposition parties have joined hands in sucking blood of common man abruptly and unseemingly.  Corruptions after Corruptions, scams after scams but nothing has turned legally against any of the person who is involved in multi crore scams. The agitations and uproar is only to mislead the masses and divert the attention so that everything is fixed meticulously. And this has resulted in threat to the very basics of Parliamentary Democracy and Constitution as a whole.
After the Opposition Parties, Media is considered to be the Fourth Pillar of the Democracy. The role of media is to highlight the day to day issues and enlight people over all the irregularities of the administrative and political branches of the country. These days media is playing very important role in curbing the crimes and wrong doings. Because of technology, people are being aware of all the national and international issues at their very homes. However, what we see that the media has also became the puppet of strong politicians and political parties. Therefore, expecting any news without any undue influence, pressure and impartial and unbiased news is a matter of yesteryears now. The media neither speaks on the issues nor highlight the problems of the common man. I would dare to say that the fourth pillar of democracy has collapsed under the feet of corrupt politicians.
It is evident that, rational authors, writers, social activists, poets have undertook the social responsibility and portraying the role of opposition party now. They raise voice against injustice from time to time. But then, those so called activists too could not dare to come out of their caste and religious notions. They do speaks on the issues aptly, but rarely seen speaking against the real problem of india ie Caste and Religious inequalities, Gender Discriminations, Communal genocides which happens almost every day at all the parts of India.
The time has come to understand the spirit of Constitution and importance of parliamentary democracy. As I mentioned in the beginning of this article is democracy is a social unity. Every member of the society should feel the pain of others, every citizen should understand the meaning and importance of fraternity and brotherhood. Then only we can think of a strong democracy and can achieve the goals enshrined in the constitution ie , Liberty, Equality, Fraternity and Justice. If we all perform our duties well then I am sure, India will be a superpower in the days to come.

References:
2.      Brainy Quotes
3.      Dr.B.R.Ambedkar speech in the Constituent Assemble on 26th November 1949.
4.      Adv Mahendra Jadhav : Online Blog

Thursday, May 7, 2015

आजची शिक्षण व्यवस्था आणि भारतीय संविधान



सूर्याला चमकण्या साठी जशी दिवसाची गरज असते, चंद्राला चमकण्या साठी जशी रात्रीची गरज असते, क्षत्रियाची ओळख व्हायला त्याच्या शूरत्वाची गरज लागते आणि ब्राह्मनाला त्याचे ब्राह्मणत्व सिद्ध करण्यासठी सदाचाराची गरज लागते..पण बुद्ध पुरुषाला चमकण्या साठी ना दिवसाची गरज लागते ना रात्रीची...त्यांच्या बुद्धीच्या प्रकाशाने बुद्ध पुरष दिवस रात्र, ३६५ दिवस सतत ह्या विश्वाला प्रकाशमान करत असतात... ह्या जगाला मानवतेचा संदेश देणारे, समता,स्वातंत्र्य,न्याय आणि बंधूता ह्या सूत्राचे जनक, ह्या जगाला लोकशाहीची ओळख करून देणारे पहिले महावैग्यानिक तथागत बुद्ध....
तथागत बुद्धांचा मानवतावादी विचार, फक्त भारतातच नव्हे तर अखंड विश्वामध्ये पोचवणारे, “सब्बदान धम्मदान जीनाती”, सगळ्या दानामध्ये जर कोणते दान श्रेष्ठ असेल तर ते धम्मासाठी केलेलं दान होय. ह्या सूत्राला आपल्या जीवनात उतरून आपली मुल महेंद्र आणि संघमित्राला धम्मासाठी दान देणारे, ह्या जगाचे सर्वश्रेष्ठ सम्राट, प्रियदर्शी सम्राट अशोक...
महाभारताला सुद्धा ज्याच्या कर्तुत्वाची दखल घेवून “कर्ण” ह्या पात्राची निर्मिती करण्यास भाग पाडणारा, पुष्यमित्र सुन्गाच्या प्रतिक्रांती नंतर बुद्ध धम्माला पुन्हा भारतात प्रस्थापित करणारा बौद्ध सम्राट शिलसुर्य सम्राट हर्षवर्धन....
आणि हजारो वर्षे जी माणसे गुलामीच्या साखळ्यात बांधली गेली होती, ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा  हक्क ह्या व्यवस्थेने हिरावून घेतला होता अशा सर्व दिन-दलित,शोषित आणि पिढीताना गुलामीच्या साखळ्यातून मुक्त करणारे, आम्हा सर्वांचे मुक्तिदाते, विश्व क्रांतीच्या इतिहासाच्या अत्युच्च शिखरावर सूर्यासारखे चमकणारे ह्या आधुनिक विश्वाचे अतिप्रगत बुद्ध प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या सर्व आदी प्रेरणांना माझे नमन...!
व तसेच ह्या सर्व महापुरुषांना जीवनभर साथ देणाऱ्या माता यशोधरा, माता सुभंद्रांगी, माता विदिशा आणि जिच्या त्यागाचे मोजमाप करण्यास शब्दही अपुरे पडतील अशी आमची आई रमाई यांच्याही त्यागमय जीवनाला माझे अभिवादन..!

मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझा समोर बसलेले माझे सर्व भाऊ बहिणींना माझा क्रांतिकारी जय भीम...
मी खास करून ह्या युवा अधिवेशनाचे आयोजक FAM टीमचे मनापासून धन्यवाद देतो कि त्यांनी मला तुमच्या समोर उभ राहून काही बोलण्याच्या लायक समजल.
मित्रहो...हा जो विषय मला देण्यात आला आहे, Education…And Indian Constitution, हा खरच खूप important विषय आणि काळाची गरज असल्या सारखा विषय आहे. बऱ्याच लोकांच्या डोक्यात "Education” ह्या शब्दाबद्दल गोंधळ असतो. काहींच्या मते "Education” म्हणजे एखादी डिग्री, एखादी शैक्षणिक उपाधी, ज्याच्या मूळ त्यांची ओळख होते...ज्याच्या मूळ आपल्याला जॉब्स मिळतात. पण माझा मते "Education” आणि Literacy हे दोन वेगळे शब्द आणि अर्थ आहेत. Being educated is different from Being Literate. Literacy तुम्हाला job आणि career देते पण Education हे आपल्याला सत्य आणि असत्या ह्यातील फरक काय असतो हे समजण्यास मदत करते. Education teaches us the sense of right and wrong !
काय ह्या देशाची वर्तमान परिस्थितीत शिक्षण व्यवस्था आपल्याला सत्य आणि असत्या ह्यातील फरक सांगत आहे ? काय वर्तमान शिक्षण आपल्याला Impartial/Unbiased शिक्षण देत आहे ? काय आजची शिक्षण प्रणाली ह्या देशातील युवकांना विश्वाला बघण्याचा वैज्ञानिक आणि तुलनात्मक दृष्टीकोन शिकवत आहे ? माझे उत्तर आहे “नाही...!”
वर्तमान शिक्षण प्रणाली ह्या देशात आधुनिक मानसिक गुलामी लादण्याच्या कामात लागलेली आहे असे माझे ठाम मत आहे. जितके जास्त शिक्षण, तीतका जास्त मासिक गुलाम...जितके जास्त शिक्षण, तितकाच जास्त गर्व, धाक आणि हुंड्याची demand. सर्व काही mechanical करून टाकलंय. सर्व बाजार करून टाकलाय !
Dr.बाबसाहेब आंबेडकर मात्र शिक्षणाला एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघत होते. त्यांच्या मते शिक्षण कोणत्याही देशाचे प्रोब्लेम्स सोडवू शकते. पण ते शिक्षण कसे असावे व कोणत्या वर्गाला भेटावे ह्या बद्दल मात्र बाबासाहेब अतिशय काळजीपूर्वक आहेत.
Dr.बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे महत्व सांगतांना आपल्या एका भाषणात म्हणतातCan education destroy caste? The answer is ‘Yes’ as well as ‘No’. If education is given as it is to-day, education can have no effect on caste. It will remain as it will be. The glaring example of it is the Brahmin Caste. Cent percent of it is educated, nay; majority of it is highly educated. Yet not one Brahmin has shown himself to be against caste. In fact an educated person belonging to the higher caste is more interested after his education to retain the Caste System than when he was not educated. For education gives him an additional interest in the retention of the Caste System namely by opening additional opportunity of getting a bigger job.
From this point of view, education is not helpful as means to dissolve caste. So far is the negative side of education. But education may be solvent if it is applied to the lower strata of the Indian Society. It would raise their spirit of rebellion. In their present state of ignorance they are the supporters of the Caste System. Once their eyes are opened they will be ready to fight the Caste System.”
बाबासाहेबांच्या मते, शिक्षण ह्या देशातील जातीवाद नष्ट करू शकते, किंबहुना ते शिक्षण देशातील शोषितांना दिल्या गेल तर...कारण सुशिक्षित शोषित तरुण अन्याया विरुद्ध बंड करू शकतील. शिक्षण त्यांना असे करण्यास प्रवृत्त करेल, प्रेरणा देईल.
आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्व समजून भारतीय संविधानात अनेक तरतुदी समाविष्ट केल्यात. Article 15, 21A, 28,30,38,39,41,45,46,47 हे काही articles आहेत जे  मुख्यता शिक्षणा बाबत बोलतात. पण आपण अस बघतो कि ह्या व्यवस्थेने देशातील शिक्षण व्यवस्थेचा व्यापार चालवलाय. एकीकडे भारतीय संविधानाचे
Art.42 आणि Art.21A अंतर्गत १४ वर्षाच्या वायोगटा पर्यंत सर्वाना मोफत शिक्षणाची गोष्ट करते आणि ही व्यवस्था सरकारी शाळा बंद करण्याच्या मागे आहे. आणि ज्या काही सरकारी शाळा चालू आहेत, त्या सर्व शाळेमधील शिक्षणाचे स्थर अतिशय हीन दर्जाचे करून टाकण्याचे काम करत आहेत.
या मध्ये एक मोठ षडयंत्रच आहे असे माझे ठाम मत आहे. देशाचे ७०% पेक्षा जास्त लोक Middle Class, Lower Middle Class आणि गरीब आहेत. आणि अधिकांश कुटुंबांचे मूल/मुली हे सरकारी शाळेत शिकतात. ह्या व्यवस्थेला हे माहित आहे कि जर एक भीमराव आंबेडकर शाळेच्या बाहेर बसून सुधा ह्या देशाचे संविधान लिहू शकतो, ह्या देशाला एक नवीन दिशा देवू शकतो, हजारो वर्षापासून चालत आलेल्या गुलामगिरीला नष्ट करू शकतो तर मग ह्या देशातील ७०% कुटुंबातील मूलाना जर श्रेष्ठ शिक्षण मिळाले तर प्रत्तेक घरातून किती आंबेडकर तयार होतील ! आणि म्हणूनच ह्या व्यवस्थेने सरकारी शाळेतील शिक्षणाचे स्थर पडून टाकण्याचे मोठे षडयंत्र चालवले आहे. पूर्ण शिक्षण खाजगी करून टाकले आहे. जिथे गरीब घरची मूल प्रवेश घेऊ शकत नाहीत, आणि खाजगी शाळेत शिकणाऱ्या मुलांसोबत compete करू शकत नाहीत.
मित्रहो, भारत हा देश जगातील सर्वात जास्त असुशिक्तांचा देश आहे. भारतातील 287 मिलियन लोकसंख्या हि असुशिक्षित आहे. हे जगाच्या लोकसंखेच्या ३७% भाग आहे हे आपल्याला माहित असावे. भारतात 4% मूल शाळेत प्रवेश पण घेत नाहीत. 58% मूल त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करत नाहीत आणि 90% मुल त्यांचे माध्यमिक शिक्षण सुधा पूर्ण करु शकत नाहीत. UNESCO च्या रिपोर्ट वर जर आपण विश्वास ठेवावा तर भारतातील फक्त 10% मूल कॉलेज चे शिक्षण घेतात. त्यामध्ये गरीब घरातील मुलांचे प्रमाण अतिशय क्षुल्लक.
CIA World Factbook च्या अनुसार जगाच्या 775 मिलियन लोकसंखेतून 75% असुशिक्षित लोक 10 देशात राहतात. ह्या देशात भारताचा सर्वात मोठा भाग आहे. भारता शिवाय चीन, पाकिस्तान, बांगलादेश, नायजेरिया, इथोपिया, इजिप्त, ब्राझील, इंडोनेशिया आणि डेमोक्राटीक रिपब्लीक ऑफ काँगो हे देश आहेत. किती शर्मेची आणि लाजिरवाणी बाब आहे हि आपल्यासाठी ? ज्या देशाने ह्या जगाला ज्ञानाची भिक दिली...ज्या देशाने ह्या विश्वाला नालंदा,तक्षशीला,विक्रमशीला,ओदन्तपुरी सारख्या जगतंमान्य विश्वविध्यालय दिले, ज्या देशामध्ये जगाच्या कानाकोपर्यातून शिक्षण घेण्यासाठी विदेशातून हजारो प्रवासी यायचे, त्याच देशाची मुल असुशिक्षित राहावी हि किती शर्मेची गोष्ट आहे...काय दिल ह्या हिंदू/ब्राह्मणी व्यवस्थेने ह्या देशाला ? असमानता...दारिद्र...धर्मांधता...गरिबी..!

6 करोड लहान मूल बाल कार्मिकीच्या गुलामीत ढकलल्या गेली आहेत, प्रत्तेक ठिकाणी आपल्याला लहान मुलांचे मानसिक आणि शारीरिक शोषण होताना दिसते. रस्त्यावर हजारो मुल भिक मागण्यासाठी मजबूर केली जातात. 80% बाल कार्मिक हे खेड्या गावात पाहायला भेटतात. ह्यात दलित आणि मुस्लीम मुलांचे प्रमाण जास्त असते हे सूर्य सत्य आहे. ह्या सर्व मुलांना शिक्षण नाही...उचित मार्गदर्शन नाही...जगण्याची आशा नाही...भविष्य नाही...एकीकडे भारताचे संविधान देशांच्या नागरिकांना सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक समानतेची गोष्ट करते आणि दुसरी कडे हि व्यवस्था ह्या देशांच्या नागरिकांवर आधुनिक गुलामगिरी लादत आहे.
मित्रहो, आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल....आपण ह्या व्यवस्थे कडून काही अपेक्षित करणे हे आता कालबाह्य झाले आहे. हि सरकार देशातील गरीब, दलित, शोषित,पिढीतांची सरकार राहिलीच नाही. हि व्यवस्था आणि सरकार पूर्णपणे कार्पोरेट सरकार झालेली आहे. आणि अशा व्यवस्थेकडून आपण काही अपेक्षित करणे हे निश्चितच चुकीचे आहे. कारण, फक्त शैक्षणिक व्यवस्थाच नव्हे तर, Healthcare, Medicine, Science, Politics, Industries, Service Sectors आणि इतर सर्व क्षेत्र त्यांनी त्यांच्या खिशात ठेवले आहेत. त्यांना ह्या देशात पुन्हा गुलामी लादायची आहे आणि ते त्या कामावर अग्रसर झाले आहेत हे आपण खुल्या डोळ्यांनी बघू शकतो.
हे सर्व आपल्या डोळ्या समोर चालत असताना, प्रत्यक्षात पाहत असताना आपण काय करू शकतो हा मोठा प्रश्न आपल्या समोर उभा आहे. आणि त्या पेक्षा पण मोठा प्रश्न म्हणजे, काय आपण ह्या व्यवस्थेला चालेंज करू शकतो ? काय आपण त्यांच्या विरुद्ध एक पर्याय म्हणून ह्या देशाला काही देवू शकतो..? उत्तर हो आणि नाही दोन्हीतही आहे. जर आपण आपली जिम्मेदारी समजाप्रती, देशाप्रती निस्वार्थ पणे पार पडली तर निश्चितच आपण एक पर्याय म्हणून उभ टाकू शकतो. आणि जर आपण आपल्या जिम्मेदारी पासून पळ काढून माझी बायको, माझे मुल, माझी नोकरी म्हणून आयुष्य व्यर्थ केल तर काहीच होणार नाही... the choice is totally ours…!

मित्रहो, आपल्या समाजात सर्वात जास्त नोकरदार हे शिक्षक वृत्तीत आहेत. खूप सारे युवक D.ed, B.ed करून वेगवेगळ्या शाळेत,संस्थेत,कॉलेज आणि विश्वविध्यालयात शिकवत आहेत. आणि त्यामुळ माझ्या मते, आपला शिक्षक वर्ग हे जास्त महत्वपूर्ण रोल निभावू शकतो असे मला वाटते. आपल्याला माहित आहे कि ह्या देशातील शैक्षणिक व्यवस्था कशी झाली आहे. आपल्याला हे हि माहित आहे कि अश्या अवस्थेत सरकारी शाळेतून एखादा दर्जेदार विद्यार्थी समोर येण अतिशय कठीण झालय. अशा परीस्थित तो मुलगा जगतीकारानाच्या ह्या competative परिस्थिती मध्ये कसे चालेंज उभे करणार आणि कसे आपले भविष उज्वल बनवनार हा मोठा प्रश्न आपल्या समोर उभा आहे.
माज्या मते आपल्या समाजातील शिक्षण मंडळीने आता समोर आले पाहिजे. गावागावात, शहरात, गल्ली-गल्लीत, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी क्लासेस सुरु करावेत. Competative शिक्षण, Technical शिक्षण, Academic मार्गदर्शन आणि अशा सर्व विभागाचे शिक्षण/मार्गदर्शन देण्याच काम जर आपल्या शिक्षक मित्रांनी युद्ध स्थरावर सुरु केल तर माझा हा आशावाद आहे कि आपण एक अतिशय कर्तबगार पिढी निर्माण करू शकू आणि ह्या देशाला एक अशी पिढी देण्यात यशस्वी होऊ जेणेकरून ती पिढी समाजाची,देशाची सेवा करेल...! आणि आपल्याला हे करावेच लागेल. काळाची गरज आहे ती...आपण जर आपली जिम्मेदारी पार नाही पडली तर येणाऱ्या पिढ्यांना आपण उत्तरदायी ठरू...!
मित्रहो...वेळ बदलली आहे, काळ बदललाय. ह्या व्यवस्थेने त्यांची strategies, plannings आणि Weapons सर्व काही बदललंय. आपल्याला पण बदलाव लागणार आहे, काळानुरूप आपल्या strategies, planning’s आणि Weapons बदलावे लागणार आहे. शत्रू ताकतवर नाही, तो कपटी आहे, नीच आहे. आणि आपल्या जवळ आहेत तथागत बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर...! विजय निश्चितच आपला होईल जर आपण निस्वार्थपणे आंबेडकरी चळवळीसाठी सर्वस्व त्यागून टाकायला तयार राहू...मानवतेच्या रक्षणासाठी जे युद्ध तथागत बुद्धाचे सुरु केले होते, त्या युद्धाला आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. इतके  बोलून मी इथेच थांबतो...जय भीम !

Adv Mahendra Jadhav
पुणे येथे दिलेले भाषण 
दि.५.३.२०१५

डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक अर्थतज्ञ



डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक साहित्याचे अध्ययन करणे एक महाकठीण काम आहे. परंतु त्याहून जास्त कठीण काम म्हणजे त्यामधील तात्विक सिद्धांताना अचूकपणे जसेच्या तसे समजून घेणे आहे. या बाबत त्यांनी भारतीय विध्यार्थ्यांना सतर्क केलेले आहे. जसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या The Evolution of Provincial Finance in British India या ग्रंथाच्या भूमिकेमध्ये लिहितात “येणाऱ्या अनेक काळापर्यंत विध्यार्थी भारतीय वित्तावर किंवा अर्थशास्त्रावर अध्ययन सदर न करू शकल्यामुळ नेहमीच माफी मागण्याच्या अपमानापासून तर आता बचावले जातील, परंतु दुसऱ्या बाजूने मला भीती आहे. तेवढ्याच अनेक काळापर्यंत त्यांना त्यांच्या या संबंधात संशोधनातील तृटीकरिता माफी मागण्याची पाळी मात्र येवू शकेल.”
ह्या देशातील विषम मानसिकते मूळ आणि बौद्धिक प्रमानिकातेच्या अभावात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वच प्रकारच्या प्रतिमांना धक्के लागत आहेत, त्यात आंबेडकरी साहित्य वाचक बहुधा त्यांना प्रज्ञावन्ताच्या उल्लेखाने नोंदवून,विषय मर्माकडे व विषय उद्देशाकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. आजच्या २१व्या शतकाच्या उंबरठयावर सर्वसामान्य माणूस नव्हे तर शिकलेली माणसेसुद्धा डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच्या विचाराना सकारात्मक दृष्टीने पाहण्याची मानसिकता ठेवीत नाहीत. सर्वसामान्य माणूस आपल्या कौटुंबिक पालनपोषण व्यस्त आहे. धनवान, विद्वान आणि नेते मंडळी आपल्या पैसा व पदप्राप्तीच्या प्रकल्पामध्ये व्यस्त आहेत. देशातील शासकीय अधिकारी वर्ग देशाच्या समस्या अंगावर आल्या तेवढ्या, वेळ काढून टाकण्याच्या पद्धतीने हाताळत आहेत. अशा वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय विचारांचा पाठपुरावा देशाला मार्गदर्शक ठरू शकतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण अर्थशास्त्रीय चिंतन राष्ट्रवादाचा उद्घोष करते. भारतीयांच्या राष्ट्रीय विकासाकरिता ते व्यक्त झालेले आहे हे सुर्यसत्य आहे.
परंतु त्यांचे विचार जर्मनीच्या फ्रेडरिक लिस्ट प्रमाणे नाहीत,ज्याने खुल्या व्यापारावर हल्ला चढविला, संरक्षण वादाचा पुरस्कार केला, जर्मनीच्या लोकांच्या कल्याणा करिता संघर्ष केला.परंतु लोकांनी त्याला दाद दिली नाही आणि शेवटी आर्थिक विवंचनेने, उपासमारीने त्यांचे आरोग्य कोसळल्यामुळ त्याने आत्महत्या केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा राष्ट्रवाद आहे हे आपल्याला व ह्या देशाला आज समजून घ्यावे लागेल. त्यांना त्यांच्या हयातीमध्ये स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही मजूरमंत्री,विधीमंत्री,संविधान मसुदा समिती अध्यक्ष,आदी साम्मानाची पदे मिळालीत. त्यांनी संविधान दिले, सशर्त फाळणी व आरक्षण व्यवस्था सुचवली आणि परंपरागत सामाजिक सांगाडा मोडीत काढला, हे सर्व करण्यासाठी समाजात खून, दंगलीचे संघर्ष होवू दिले नाही. त्यांनी राष्ट्राची एकूणच सहमती मिळवली या ठिकाणी असे सहजपणे दिसते कि, त्यांच्या विचारांचे अनुगमन झाले नाही तर भारतासारख्या कोणत्याही जात्यांध व दारिद्र्याने पछाडलेल्या राष्ट्रालाच आत्महत्या करावी लागेल! जसे पाकिस्तान,बांगलादेश आणि इतर आशियाई देशात घडत आहे. आपल्याला हे सत्य मान्य मारावे लागेल कि भारत देश जिथे हजारो जाती, ना ना धर्म, ना ना पंथ, जातील सर्वच मुख्य धर्म आणि लाखो भाषा,संस्कृत्या असूनही हा देश आजही अखंडित आहे तो फक्त भारतीय संविधाना मुळ, बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाही मूळ...!
मित्रहो, भारतातील विकास दर दिवसेंदिवस द्वीअंकीवर जाते आहे, मात्र भारतीय सामान्य माणूस अनेक आर्थिक प्रश्नांनी निराश व हताश झालेला आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रथम क्षेत्रात कृषी क्षेत्रातील लोकांचे आजपर्यंत प्रचंड झालेले शोषण आणि यामुळे हताश शेतकरी आत्महत्या करीत आहेत. गरीब जास्त गरीब होत आहे आणि श्रीमंत जास्त श्रीमंत होत चालला आहे. पैशाचे हे केंद्रीकरण वेळीच थांबले नाही तर ह्या देशातील गरीब लोकांजवळ आत्महत्ते शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही हा इशारा मला ह्या व्यासपीठावरून द्यावा वाटत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील, कृशीला उद्योगाच दर्जा का देण्यात आला नाही हे समजून घेण्यासारखे आहे. सामाजिक अस्पृश्यतेने,धर्मांधतेने, जातीवादाने पछाडलेले लोक राष्ट्रीय हित जोपासणे दुय्यम समजतात हि एक देशाला लागलेली कीड होय. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताला राष्ट्रीयत्वाचे छायाछात्र व पांघरून मिळाले आहे, मात्र त्या खाली चाललेले छुपे सामाजिक बहिश्करण जे स्वातंत्र्यानंतर सर्वथा निषिद्ध आहे, ते राष्ट्रीय बहिश्करण होत असल्याची जाणीव आम्हाला नाहीय. राष्ट्रीय बहिष्करणाच्या अभिव्यक्तीला सक्षमपणे रोखण्यासाठी व वर्तमान काळातील बदलांना सक्षमपणे झेलन्याकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्यक्षात आमलात आणणे आवश्यक आहे.परंतु आज हातात असलेली वेळ निघून जाऊ नये, हि काळाची रास्त अपेक्षा होय !  
डॉ.बाबासाहेब आंबेडकर २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात एक ताकीद देतात, ते म्हणतात “ संविधान कितीही लायक असले तरी त्यांना राबवणारे लोक जर लायक नसतील तर ते संविधान कुचकामी ठरते, आणि जर त्याला राबवणारे जर लायक असतील तर निकृष्ठ दर्जाचे संविधानही सर्वोत्कृस्थ ठरते.”
आपल्या राज्यघटनेने स्वीकारलेल्या लोकशाही बद्दल प्रत्तेक भारतीयांनी अभिमान बाळगावा, परंतु धुंदीत मात्र राहू नये असे आवाहन बाबासाहेबांनी घटना समितीसमोर केले होते. केवळ राजकीय लोकशाहीत आपण समाधानी राहता कामी नये. राजकीय लोकशाहीचे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये रुपांतर केले पाहिजे. राजकीय लोकशाही हि जर सामाजिक लोकशाहीवर अधिष्ठित केली नाही तर ती टिकूनच राहणार नाही. कारण लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव हि एक अखंड आणि अभंग त्रिमूर्ती आहे. जर लोकशाहीत सामाजिक समता नसेल तर ती व्यक्तीच्या जीवनातील स्वयप्रेरना नष्ट करेल.
बाबासाहेब आपल्या भाषणात पुढे बोलतात कि “२६ जानेवारी १९५० रोजी आपणाला राजकीय समता लाभेल, पण सामाजिक व आर्थिक जीवनात असमानता राहील आणि जर हि विसंगती आपण लवकरात लवकर नष्ट करण्याचे प्रयत्न केले नाही तर ज्यांना विषमतेची आच लागली ते लोक न्यायाच्या अभावी मोठ्या परिश्रमाने बांधलेला राज्य घटनेचा लोकशाही रुपी मनोरा उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.” भारताची घटना लिहिताना डॉ.बाबासाहेबांवर दुहेरी स्वरुपाची जवाबदारी आली होती. एकतर देशाच्या सर्वांगीण विकासाच्या, उज्वल भवितव्याच्या दृष्टीने घटना तयार करावयाची होती, तर दुसरीकडे त्यात अल्पसंख्यांकांच्या, अस्पृश्यांच्या हक्कांचे सरंक्षण करावयाचे होते.  त्यांना राज्यघटना अशा देशासाठी करायची होती, जिथे भिन्न जाती, भिन्न धर्माचे, भिन्न संस्कृतीचे, भिन्न संप्रदाय तथा भिन्न भाषेचे लोक एकत्र राहत होते. तरी ते आवाहन बाबासाहेबांनी स्वीकारले आणि यशस्वीपणे जगातील सर्वश्रेस्ट संविधान दिले.
बाबासाहेबांना हवे तसे कायदे संविधानामध्ये समाविष्ट करता आले नाहीत. ज्यामध्ये प्रामुख्याने राज्य समाजवाद, समान दिवाणी संहिता, हवी तशी कार्यपालिका, सामुदायिक शेती,जमिनीचे राष्ट्रीयकरण, राईट टू वर्क, संपत्तीचा मौलिक अधिकार नाकारणे, एक राष्ट्र एक भाषा इत्यादी महत्वपूर्ण ऐतिहासिक बदल घडविण्यात बाबासाहेबांना यश आले नाही. तरी पण बाबासाहेबांनी संविधानात Part.III Art.12-35 जे भारतीय नागरिकांच्या मुलभूत हक्का बद्दल बोलतात आणि Part IV Art.36-51 जे Directive Principles Of States Policies बद्दल बोलतात. हे सर्वच Articles भारतीय नागरिकांच्या फक्त मुलभूत हक्काबद्द्लच बोलत नसून देशाच्या सर्वांगीण विकासाची नांदी घालते. भारतीय संविधानाचे स्पिरीट जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असे जाणवेल कि बाबासाहेबांनी देशाच्या प्रत्तेक वर्गाच्या हक्कांची काळजी घेतलेली आहे. पण भारतीय लोकांची मानसिकता अशी आहे कि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना व भारतीय संविधानाला एका हीन दृष्टीने बघितले जाते हि मोठी शोकांतिका आहे. 
बाबासाहेबांची विद्वत्ता आणि त्यांना जे संविधान अपेक्षित आणि देशातील अल्पसंख्यांक आणि दलित, शोषित, पिधीतांच्या हक्कांचे रक्षण व्हावे म्हणून त्यांनी आपले सामाजिक आणि आर्थिक विचार आपल्या अप्रतिम ग्रंथात म्हणजे States And Minorities टाकली. ह्या ग्रंथात बाबासाहेबांनी आपले आर्थिक विचार आणि देशाची आर्थिक संरचना कशी असावी यावर भर दिला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण देशाचा आर्थिक पुनररचनेचा आराखडा तयार केला होता. एवढेच नव्हे तर या योजनेचा संबंध राजकीय लोकशाहीच्या स्वरूपात होता हे विशेष. ह्या आर्थिक योजनेनुसार शेती विकासाच्या बाबतीत बाबासाहेबांनी देशातील संपूर्ण जमिनीचे राष्ट्रीयकरण करून संपूर्ण देशात सामुहिक शेती पद्धती, सहकारी शेतीपद्धती आमलात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. ह्या आर्थिक योजनेद्वारे बाबासाहेबांना देशात राज्य समाजवाद आणावयाचा होता. ज्यामधून त्यांना भांडवलदार वर्गाची संपत्तीवर अमर्याद मालकीवर रोक आणून सर्वहारा शोषित जनतेला देशाच्या आर्थिक विकासामध्ये सहभागी करून घ्यावयाचे होते.
या योजने नुसार शेती हा शासकीय उद्योग असावा,शेती शासनाच्या मालकीची असावी,किंवा देशातील सर्व जमीन मग ती मालकीची असो, कुळाची असो किंवा त्याच्याकडे ती गहाण असो, ती ताब्यात घेताना त्या जमिनीचा योग्य तो मोबदला भू-धारकास देण्यात यावा. राज्याच्या अधिपत्याखाली सामुहिक पद्धतीच्या शेतीबरोबर कृषी व ओद्योगिक क्षेत्रात संशोधित स्वरुपाची राज्य समाजवादाची प्रस्तावना मांडली.
शेती हा राज्य उद्योग असावा, कृषी उद्योगाला राष्ट्रीयकरण करण्यात यावे, पायाभूत मुलभूत उद्योग राज्य सरकारच्य मालकीचे करावेत. विमा व बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात येवून विमा हि संपूर्णपणे राज्यसत्तेच्या अधिपत्याखाली असावी, राज्यसत्तेच्या संपूर्ण नियंत्रणाखाली अर्थव्यवस्थेचे झपाट्याने औद्योगीकरण व्हावे, राज्यातील प्रत्तेक निमशासकीय नोकरांना त्यांच्या वेतनाच्या प्रमाणात जे विधान सभा निश्चित करेल त्यानुसार विमा काढण्यास सक्ती करण्यात यावी, मुलभूल व पायाभूत उद्योग राज्य सरकारच्या मालकीचे करून राज्य हे उद्योग,विमा आणि शेती योग्य भूमीला त्यांच्या मालकाकडून चालू निर्धारित भावाने कर्ज रोख्याच्या स्वरुपात विकत घेईल. कर्ज रोख्याची रक्कम रोख स्वरुपात व केंव्हा द्यायची हे राज्यच ठरवेल. अश्या प्रकारे बाबासाहेब वरील योजनाच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास, अधिक उत्पादन आणि जनतेच्या प्रत्यक्ष सहभागातून भारताचे नवे भविष्य घडवू इच्छित होते.
बाबासाहेबांनी औध्योगीकरणाचा जोरदार पाठपुरवा केला होता. त्यांच्या मते लोकशाही म्हणजे अधिक यंत्रे आणि अधिक औद्योगिकरण व त्यातून अधिक आर्थिक लाभ, असे बाबासाहेबांचे घोष वाक्य होते. त्यांना ग्रामीण भागातील गावगाडा व बलुतेदारी पद्धती आणि एकूणच ग्रामीण व्यवस्थेची सामाजिक, आर्थिक संरचना मोडून काढावयाची होती. म्हणून ते गांधीच्या “खेड्याकडे चला” चरखा सुत कतायी, स्वदेशी चळवळ व विश्वस्ताची कल्पना या विचारसरणीच्या विरोधात होते. त्यांच्या मते या विचारसरनी मधून ग्रामीण भागाचे ओंगळवाणे चित्र व लाजिरवाणे जगणेच प्रत्ययास येईल, असे त्यांना वाटत होते.
States And Minorities ह्या योजनेमधून बाबासाहेबांना केवळ आपल्या देशातील अल्पसंख्यांक आणि अस्पृश्य समाजाच्या सामाजिक, आर्थिक विकासाचाच समावेश नव्हता, केवळ देशाच्या औद्योगीकरण व शेती विकासावरच भर दिल्या गेला नव्हता तर या योजनेमधून त्यांना धर्मनिरपेक्षतेचे तत्व हि आपल्या देशात कायम स्वरूपी रुजवायचे होते हे दिसून येते.
डॉ.बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळेच RBI ची रचना झाली. बाबासाहेबांनी जे Hunter कमिशनला सजेशन दिले होते त्या सजेशनवर आधारितच आजची RBI काम करत आहे हे आपल्याला माहितच असेल. द्वितीय महायुद्धाच्या काळात म्हणजे १९३९-४५ बाबासाहेबांची भूमिका हि खऱ्या रीतीने देशभक्तीने ओतप्रोत होती आणि त्यांनी सांगितलेला एक एक शब्द त्या काळात असा खरा होत होता जसे कि त्यांनी ह्या जगाचेच भवितव्य लिहिले कि काय..!
मित्रहो, अस काय आहे जे बाबासाहेबांना जगाच्या सर्वच तत्ववेत्याहून एक पाऊल पुढे नेते ? आपण जर जगातील तत्ववेत्त्यांचा अभ्यास केला तर आपल्याला असे दिसेल कि तथाकथित तत्वज्ञानी त्यांच्या सामाजिक परिवेशात अत्युच्च पदांवर होते. Plato हा अति श्रीमंत बापाचा मुलगा होता, त्याच्या वडिलांनी Plato ला चांगले शिक्षण मिळावे ह्यासाठी ते सर्वच केले जो एक वडील करतो. Aristotal वयाच्या १८व्या वर्षीच Plato Academi मध्ये शिक्षण घेण्यास जातो आणि वयाच्या ३७व्या वर्षा पर्यंत तिथे शिक्षण घेवून physics, biology, zoology, metaphysics, logic, ethics, poetry, theater, music, , politics and government या विषयांचे शिक्षण घेतो आणि  सिकंदरला द ग्रेट घडवतो जो स्वतः एक सम्राट होता. आधुनिक युगात जर आपण नजर टाकली तर आपल्या पुढ एक श्रेष्ठ एकॉनोमिस्ट बघायला भेटतो तो म्हणजे कार्ल मार्क्स...! तो पण एका श्रीमंत घरात जन्माला आला आणि जर्मनीच्या बोन आणि बर्लिन विश्वाविध्यालयात त्याने  त्याचे शिक्षण घेतले आणि बरीच पुस्तक लिहिली. त्यात मुख्यता दास कॅपिटल आणि कम्युनिस्ट मानिफेस्टो हे आहेत. यांच्या व्यतिरिक्त जे युरोपिअन थिंकर्स आहेत जसे जॉन लॉक, थोमस हॉब्स, इमानुल कान्ट, रुसो, डेविड ह्यूम, मेक्स मुलर, अमर्त्य सेन, मार्शल  ह्या सर्वांचे तत्वज्ञान त्यांचा मरणोप्रांत लोकांनी स्वीकारले आणि प्रत्तेकानी आपापल्या मर्यादेत राहूनच त्यांची फिलोसोफी समाजापुढ ठेवली. पण बाबासाहेब आंबेडकर एक अस व्यक्तिमत्व आहे ज्यांनी एका अस्पृश्य घरात जन्म घेवून, शाळेच्या बाहेर बसून शिक्षण  घेतले, दररोज जनावरापेक्षा हीन अशी व्यवस्था झेलून सुद्धा ह्या देशातच कुणी ईतके शिक्षण घेतले नाही तितके बाबासाहेबांनी घेतले. एवढेच नव्हे तर त्यांनी ह्या देशाला एक नवीन दिशा दिला, एक नवीन भविष्य दिले. हजारो वर्षापासून चालत आलेल्या मानसिक, शारीरिक गुलामगिरीला मुळापासून उपटुन फेकले. आणि ते सुद्धा रक्ताचा एकही थेंब न सांडवता...! आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर जगाच्या त्या सर्व तत्ववेत्त्यांच्या तुलनेत एक पाऊल पुढ निघून जातात..! त्यांच्या भविष्याला छेद देणाऱ्या ज्ञानाला जगातच तोड नाही हे विदित आहेच. आणि म्हणूनच कोलंबिया विश्वविद्यालयाने त्यांना “सिम्बॉल ऑफ नॉलेज” असे संबोधले आहे. हे भारतासाठी गर्वाची बाब असूनही ह्या देशाची मानसिकता त्यांना आजही एक दलित नेता म्हणूनच हिणावते हि मोठी शोकांतिका आहे.  
मित्रहो, आज वेळ आलेली आहे कि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार समजून समाज आणि देशाच्या प्रगती साठी ते कशे पूरक आहेत हे संपूर्ण देशाला पटवून सांगावे लागेल.तरच ह्या देशाला आपण एक नवीन दिशा मिळेल...तरच ह्या देशात समता,स्वतंत्रता,बंधुता आणि न्याय नांदेल...! 
भारतातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक तथा आर्थिक गुलामगिरीच्या अन्यायी पाशातून कोट्यावधी शोषितांची आणि अल्पसंख्याकांची मुक्ती करणारा आणि समस्त मानव मुक्तीच्या लढ्यातून शोषितांच्या अंतकरणात आपल्या कृतीतून क्रांतिकारी विचार पेरणाऱ्या एका परिवर्तनशील क्रांतिकारी संघर्षाचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहे आणि आपल्या सर्वांनाच देशाच्या ह्या महान सापुताचा अभिमान वाटायला हवा. 


Sunday, August 24, 2014

Basic Pillar of Democracy



BASIC PILLAR OF DEMOCRACY : OPPOSITION PARTY AND THE ROLE OF AMBEDKARRITES...

One of the basic pillars of Democracy is the presence of Opposition Party. But have unfortunetely the in the land of India, the Ruling Party and Opposition Party have changed into the two sides of the same coin. The Opposition Party no longer is playing the role of PEOPLE'S VOICE. The Ruling Party and Opposition Party have joined the hands and SUCKING THE BLOOD of common Man...

After the Oppositio Party, there is MEDIA which is considered as THE FOURTH PILLAR OF DEMOCRACY. The sad thing is all forms of Media ie Print, Electronic, Social Networkings etc. have become the PUPPETS OF POLITICALS PARTIES..Therefore expecting Media to speak on behalf of comman man is a matter of negligence. The Media neither speak nor highlights the issues related with the common man. Hence I would dare to say that THE FOURTH PILLAR OF THE DEMOCRACY has collapsed under the feets of corrupt politics..

To some extents the authors, writers, peots and social activists are raising their voices against the injustice and social issues. But then, those SO CALLED ACTIVISTS  too could not dare to COME OUT OF THEIR CASTE AND RELIGION and speak on ACTUAL PROBLEMS OF THIS GREAT NATION ie Caste Inequality, Raligious Fundamentalis, Gender Inequality, The communal Genocietes which happens almost everyday in all parts of this country. The SO CALLED ACTIVISTS  rather pointing out at the ROOT CAUSE of the this country tries to gain the publicity and money out of it.

However, despite all these major issues, there is one class of people who is playing the ACTUAL ROLE OF Opposition Party and that is THE FOLLOWERS OF DR.BABASAHEB AMBEDKAR. ( THE AMBEDKARRITES). These people have taken the responsibility to raise their voice against all the social attrocities, inequalities. They dare to question the Age Old System Openly and challenges the same. They are the first to come on roads against any issues, they are the first to sacrify their lives for common man's problems. They not only speak,write against the the systems but also setting up the subtle example for the future generations.

I Salute those who stand high despite all the criticizm...
I Salute those who speak against Injustice...

Proud to be An Ambedkarrite..!